tag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post5472949289830943129..comments2022-04-01T09:03:32.640-07:00Comments on पंचनामा: सभ्य मुखवट्यातले विद्रुप विकृत चेहरेbhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-37435635178969835322013-09-19T23:43:15.227-07:002013-09-19T23:43:15.227-07:00tyanche nivedan kuthe vachayla milel ka?tyanche nivedan kuthe vachayla milel ka?Anonymoushttps://www.blogger.com/profile/13850233321584014102noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-58273893364785573072013-03-25T00:33:14.124-07:002013-03-25T00:33:14.124-07:00भाऊ ,या बिनडोक माणसाची लक्तरे वेशीवर टांगल्या बद्द...भाऊ ,या बिनडोक माणसाची लक्तरे वेशीवर टांगल्या बद्दल तुमचे अभिनंदन.<br />कोळसा घोटाळ्याप्रकरणी जो माणूस आपल्या मालकाला म्हणजे राजेन्द्र दर्डा यांना जाब विचारण्याची हिम्मत करू शकत नाही त्याला इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही.<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/04079400756986127441noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-86513602192327117052013-03-24T21:17:49.894-07:002013-03-24T21:17:49.894-07:00आजच्या मराठी वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत म्हणायचे झा...आजच्या मराठी वृत्तवाहिन्यांच्या बाबतीत म्हणायचे झाल्याय, आपण बोलु ती पुर्व दिशा अशा आवेशात ते दिसत आहेत. कोणत्याही चर्चेत त्या वृत्तवाहिनी आपले एक मत ठरवुन असते, मग समोरच्या पाहुण्या वक्त्याच्या तोंडुनही तेच काढण्याचा प्रयत्न होताना दिसतो. आपले 'वेगळे' हेसुद्धा काही वेगळे करत नाहित. इतर वक्ते काहीही बोलले तरी त्यांना हवं तेच मत ते मांडताना दिसतात. आपला पोल जास्त आला तर ते लढाई जिकले अशा अविर्भात असतात, पोल कमी आला तर अजुनही लोकांना कळत नाही असा त्यांच्या सुर असतो. म्हणजे त्यांना आपल्या सोईनुसार पोल आले तरच त्यांचे प्रेक्षक शहाणे वाटतात. प्राईम टाईमचा वेळ अनेकदा विकला जातो, याची कबुली अनेकदा या साहेबांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसमोर दिली आहे. माध्यमे विकाऊ आहेत हेही ते आणि त्यांच्यावर वरदहस्त असणारे अनेकदा सांगताना दिसतात, मात्र त्याचवेळी "आम्ही नाही त्यातले " हेही सिद्ध करतात. म्हणजे इथेही सोयीनुसार.....<br />एकंदरीतच सर्व ठिकाणी हे सोयीची पत्रकारिता करत आहेत, हे नक्की.Anonymoushttps://www.blogger.com/profile/03771738873091598839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-25542334377662539512013-03-24T12:07:14.073-07:002013-03-24T12:07:14.073-07:00माननीय पत्रकार, भाऊ तोरसेकर, तुमचे म्हणणे मला संपू...माननीय पत्रकार, भाऊ तोरसेकर, तुमचे म्हणणे मला संपूर्ण पटत नाही. पण अमेरिकेतील माफियांचे उदाहरण पटले. मी निखिलच्या बाजूनेही नाही आणि विरुद्धही नाही. निखिलने सध्या दर्डाशी, शरद पवारांशी आणि अगदी शिवसेनेशी केलेली तडजोड मला पटली नाही. कोठल्याही पत्रकाराने निस्पृह, खऱ्या अर्थाने सेक्युलर आणि कोठल्याही पक्षांचे प्रवक्ते असता कामा नये. <br /><br />तुमचा Blog "सभ्य मुखवट्यातले" वाचले फारच छान आहे. मला इथे ग्रीक पुराणातील Antigone(अन्तीगोनि ) ची कथा आठवली. अन्तीगोनीचे दोन भाऊ, (इडीपसचे दोन मुलगे) पोलीनेसीस आणि एतेओक्लिस हे इडीपसच्या मृत्यूनंतर आपापसात सत्तेसाठी भांडतात. दोघे सारखेच दुराचारी, दुर्वर्तनी, सर्वच बाबतीत भ्रष्ट. पण सत्तेसाठी झालेल्या युद्धानंतर दोघेही एकमेकांना ठार मारतात. एकाचे म्हणजे पोलीनेसीसचे प्रेत विच्चिन्न वस्थेत मिळते आणि एतेओक्लिसचे प्रेत चांगल्या अवस्थेत मिळते. तेथील जनता / लोक एतेओक्लिस चे स्मारक करतात आणि पोलीनेसीसचे प्रेत लांडगे, गिधाडांना खाण्यासाठी ठेवतात. अन्तीगोनि स्वतःच्या दुसऱ्या भावाच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि स्मारकासाठी भांडते आणि या प्रक्रियेत तिचा मृत्यू होतो. <br /><br />थोडक्यात काय आजचे बहुसंख्य राजकीय नेते/पक्ष या दोन भावांसारखे आहेत. आणि जनता त्या वेळेच्या ग्रीक जनतेसारखीच भाबडी आहे. तिच्यासमोर जी वाईट गोष्ट चांगल्या पद्धतीने ठेवली जाते त्यांना ते चांगले म्हणतात. आणि हे काम paid news घेणारे पत्रकार चांगले काम करतात. आणि निस्पृह लोक अन्तीगोनि सारखे फुकट भांडतात किंवा मरतात. आणि जनता लाटेत भ्रष्ट राजकिय नेते निवडून येतात. हेच तर भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे.DnyaneshParabhttps://www.blogger.com/profile/04537710307020774684noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-34496684448818266812013-03-24T08:12:30.708-07:002013-03-24T08:12:30.708-07:00ज्या पोलीस अधिकार्यावर हक्कभंगाच्या कारवाईची नोटी...ज्या पोलीस अधिकार्यावर हक्कभंगाच्या कारवाईची नोटीस देण्यात आली आहे, त्याला कायदेमंडळाच्या सदस्यांनी कायदेमंडळाच्या प्रांगणात लाथाबुक्क्यांनी मारणं हे निषेधार्हच आहे. या घटनेची बातमी देणार्या आणि त्यावर भाष्य करणार्या पत्रकारांच्या विरोधातही कायदेमंडळाच्या काही सदस्यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस देणं ह्याचाही निषेधच करायला हवा. कायदेमंडळाचे सदस्य विशेषाधिकाराचा दुरुपयोग करू लागले आहेत. <br />राहीला मुद्दा पत्रकारांच्या भ्रष्टाचाराचा. वर्तमानपत्रांतील पत्रकारांसाठी आचारसंहिता आहे. तिचा भंग त्यांनी केला असेल तर प्रेस कौन्सिलकडे दाद मागता येते. दूरचित्रवाणी माध्यमातल्या पत्रकारांसाठीही आचारसंहिता आहे मात्र ती जारी करणार्या संस्थेला प्रेस कौन्सिलप्रमाणे अधिकार नाहीत. <br />भारतात वर्तमानपत्रांची संख्या प्रचंड आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात १०० वर्तमानपत्रे आहेत. त्यामुळे कोण, कुणावर आणि कसं नियंत्रण ठेवणार हा प्रश्नच आहे. वर्तमानपत्र व्यावसायिकरित्या चालवली गेली तरच त्यांची संख्या नियंत्रणात येऊ शकते. अन्यथा नाही. Sunilhttps://www.blogger.com/profile/00443725733251481715noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-67361546353869894822013-03-24T04:19:19.936-07:002013-03-24T04:19:19.936-07:00सुंदर लेख आहे भाऊ. ती मुलाखत मीही पाहिली होती, आणि...सुंदर लेख आहे भाऊ. ती मुलाखत मीही पाहिली होती, आणि एकूण अभिनिवेष आणि अविर्भाव पाहून हीच शंका मलाही आली होती, पण दुर्दैवाने इतके विलक्षण प्रभावी माध्यम (माकडाच्या हातात कोलीत!) ह्यांच्या हाती लागल्याने ह्यांचे इतके फावते आहे! तुम्ही तुमचे काम अविरतपणे चालू ठेवा. आमच्यासारखे वाचक अजून वाचन करीत आहेत, आणि लोकांना वाचायला तुमचे लेखही शेअर करीत आहेत.Anonymoushttps://www.blogger.com/profile/18387448048902866277noreply@blogger.com